Sunday, September 16, 2012

महाराष्ट्रासाठी मराठ्यांनी निकोप राहणे गरजेचे : डॉ. मोरे

दैनिक एकमत, ११ सप्टेंबर २०१२ 
 महाराष्ट्र निकोप राहण्यासाठी मराठ्यांनी निकोप राहणे गरजेचे आहे असे मत जेष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले. गणेश वाचनालय व जनशक्ती वाचक चळवळ आयोजीत बी. रघुनाथ महोत्सवात एक पुस्तक एक दिवस या अंतर्गत राम जगताप, सुशील धसकटे यांनी संपादीत केलेल्या मराठा समाज वास्तव आणि अपेक्षा या ग्रंथावर परिचर्चा आयोजीत करण्यात आली होती.
 या परिचर्चेत स्वतः दोन्ही संपादक तसेच या पुस्तकाला ज्यांची प्रस्तावना लाभली आहे असे डॉ. सदानंद मोरे सहभागी झाले होते. पुढे बोलतांना डॉ. मोरे म्हणाले की या लेखातील बहुतेक लेख मराठा समाजातील लेखकांनी लिहलेले आहेत व ते चांगले आहेत. मराठ्यांनी लिहलेल्या लेखातही आत्मसमर्थनाचा सुर आहे. एकतर वास्तवाचे दर्शन आणि स्विकार किंवा आत्मटिका असे स्वरुप लेखांचे आहे. मराठ्यांमधील दोषाचे उदात्तीकरण करतांना कोणी दिसत नाही. हे लेख भांडारकर संस्था प्रकरणाच्या आधीचे आहेत. त्यामुळे पुर्वीचे अनेक संदर्भ आज बदलले आहेत. या प्रकरणानंतर मराठ्यांच्या संघटना आक्रमक झाल्या. मराठ्यांना दोषासगट स्विकारण्याची भाषा बोलु लागल्या. याचाच एक परिणाम म्हणजे मराठ्यांबद्दल चर्चा करण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे ते म्हणाले. सुरुवातीला लेखक सुशील धसकटे यांनी सांगितले की प्रस्तुत लेख संग्रहाची कल्पना आम्हाला सुचली ती सत्याग्रही जीवनधाराच्या मराठा विशेषंकावरुन विविध लेखांच्या माध्यमातुन छोट्या ग्रंथातुन वेळोवेळी मराठा समाजा विषयी लिखान झाले. काही वेळा तेवढ्या पुरती चर्चाही झाली. पण बहुतेक वेळा ती तेवढ्या पुरतीच राहिली. ती तशीच नियतकालीकांच्या पानाआडपडु न देता अधिकाधिक लोकांपर्यंत विशेषतः तरुण पिढी पर्यंत जावी म्हणुन त्यातील काही निवडक लेख या लेख संग्रहात उपलब्ध करुन दिले आहेत. राम जगताप म्हणाले की मराठा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज मानला जातो. मराठा तरुणांनी आत्मपरिक्षणाला सिध्द व्हावे हाच आमचा एकमात्र उद्देश हा पुस्तक निर्मितीमागे आहे असे ते म्हणाले कार्यक्रमास नागरीक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment