Monday, June 4, 2012

...नाही तर तुमच्याशिवाय

सब-कुछ ख़त्म हो जाने को भाषा स्वीकार नहीं करती, कला को शायद यह स्वीकार करना पडम्ता है. (संपादकीय, क)
  
हिंदीमध्ये या एकाक्षरी नावाचे चित्रकला, शिल्पकला आणि वैचारिक साहित्याला वाहिलेले द्वैमासिक आहे. मराठीमध्ये एकेकाळी अभिरूचीहेसत्यकथेच्या तोडीचं साहित्यविषयक मासिक होतं. त्यात पुरुषराज अळूरपांडे या नावाने पु.ल. देशपांडे, मं.वि. राजाध्यक्ष आणि अळूरकर हे तीन लेखक एक सदर लिहायचे. ..तर या मासिकामध्ये इरावती कर्वे या टोपणनावानं काही काळ लेखन करत होत्या. त्याची इथं काही जाणकार वाचकांना पटकन आठवण होऊ शकते.
 
 चा खुलासा करताना संपादक अंकाच्या मलपृष्ठावर कला सम्पदा एवं वैचारिकीअसंही आवर्जून छापतात. या अंकाचे संपादक आहेत विजय शंकर. त्यांच्या शब्दात या मासिकाचं स्वरूप असं आहे, ‘‘ ‘हिन्दी भाषा की एक बहुआयामी एवं बहुउद्देशीय कला पत्रिका है. हमारा साम्प्रतिक लक्ष्य भिन्न भारतीय भाषाओं के प्रमुख कवियों को पाठकों के समक्ष उपस्थित करना एवं उनकी कृतियों की आलोचना एवं समीक्षा करना है. यह प्रचेष्टा का एक पहलू है. विभिन्न भाषाओं के साहित्य, साहित्यकार एवं साहित्य प्रेमियों के बीच भावों के आदान-प्रदान एवं मत विनिमय को गति प्रदान करने के साथ-साथ उसे सशक्त भी करना है.’’ या अवतरणातली हिंदी वाचायला आणि समजायला थोडी कठीण वाटू शकते. तरी ते मुद्दाम दिला आहे. त्याची दोन कारणं आहेत, एक म्हणजे हिंदी भाषेचं अतिशय समृद्ध आणि गंभीर रूप हे या अंकाचं एक वैशिष्टय़ आहे. आणि दुसरं, गंभीर वौचारिक साहित्य.
 
 च्या कुठल्याच अंकातून करमणूक होण्याची शक्यता नाही. समाज प्रबोधन पत्रिकाहे मराठीतील नियतकालिक किंवा इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकलीहे इंग्रजीतील साप्ताहिक वाचताना अक्षरक्ष: झोप येते हो, असा उसासा टाकणा-या वाचकांसाठी हे मासिक अजिबात नाही. ज्यांना गंभीरपणे साहित्य आणि कलांविषयी जाणून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठीच हे मासिक आहे.
 पण मग इतकं गंभीर मासिक चालू कसं काय शकतं असा प्रश्न काहींना पडू शकतो. पण आधी उल्लेख केलेल्या दोन्ही नियतकालिकांप्रमाणे ते अव्याहतपणे सुरू आहे. एवढंच नव्हे तर आठ वर्षापूर्वी सुरू झालेल्या या मासिकानं हिंदी आणि भारतीय भाषेतील जिज्ञासू वाचकांच्या वाचनक्रमात हक्काचं स्थान मिळवलं आहे.
या अंकात गंभीर लेखन वाचायला मिळतं तसं भारतीय भाषेतील एका मान्यवर कवीच्या आठ-दहा कविता आणि त्या कवीविषयीचा लेखही आवर्जून दिला जातो. विंदा कंरदीकर, के. सच्चिदानंद, उडिया कवी राधानाथ राय, पंजाबी कवी हरिभजन सिंह अशा दिग्गजांच्या कविताही या अंकातून प्रकाशित झाल्या आहेत, होत असतात.
 
हे मासिक डबल डेमी आकाराचे आहे. याची कागद आणि छपाई अतिशय उकृष्ट आणि निर्दोष असते. एक अंक जेमतेम चौतीस पानांचाच असतो, पण तो संपूर्ण वाचून काढायला किमान एक पूर्ण दिवस लागतो. या अंकाची मुखपृष्ठं आणि मलपृष्ठंही सुंदर असतात.
 वेगवेगळ्या भाषेतील साहित्य आणि भारतीय-आंतरराष्ट्र्रीय पातळीवरील चित्रकला, शिल्पकला याविषयी जाणून घ्यायचं असेल तरच या अंकाच्या वाटेला जावं. कारण अंकाच्या संपादक मंडळाचा मुळी असाच आग्रह आहे की, ‘आलात तर तुमच्यासह, नाही तर तुमच्याशिवाय.तेव्हा निर्णय तुमचा आहे.

No comments:

Post a Comment